Friday 31 January 2020

जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता क्रमवारीत भारताची 79 स्थानाची झेप

2014 मधल्या 142 व्या स्थानावरून 2019 मधे 63 वे स्थान प्राप्त


केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2019-2020 या वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केले. जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता क्रमवारीत भारताने 79 स्थानांची झेप घेतल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले. 2014 मधल्या 142 व्या स्थानावरून भारताने 2019 मध्ये 63 वे स्थान प्राप्त केले आहे.
10 निकषांपैकी भारताने 7 मध्ये प्रगती केली आहे.सुधारणांच्या सर्वोच्च स्थानी वस्तू आणि सेवा कर आणि नादारी आणि दिवाळखोरी संदर्भातला कायदा आहे, ज्यामुळे भारताच्या क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. व्यवसाय सुरू करण्यात सुलभता,( 136 श्रेणी), मालमत्ता नोंदणी (154 श्रेणी), कर देणे (115 श्रेणी) यासारख्या काही निकषांमध्ये भारत अद्याप मागे आहे.
भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया गेल्या 10 वर्षात 13 वरून 10 पर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.आता भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 18 दिवस लागतात.2009 मध्ये हा कालावधी 30 दिवसांचा होता. व्यवसाय सुरू करण्यासाठी,वेळ आणि खर्च यामध्ये भारताने बरीच कपात केली असली तरी अद्याप बरेच करण्याची आवश्यकता आहे.
सेवा क्षेत्रातही दैनंदिन व्यवसायासाठी अद्याप अनेक नियामक अडथळ्याना तोंड द्यावे लागते. बार आणि रेस्टोरंट क्षेत्र, जगभरात रोजगार आणि विकासाचा महत्वाचा स्रोत आहे.भारतात रेस्टोरंट उघडण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या ही इतर ठिकाणच्या संख्यांपेक्षा अधिक असल्याचे एक सर्वेक्षणात आढळून आले आहे.
बांधकाम परवाने
गेल्या पाच वर्षात भारताने बांधकाम परवान्यांच्या प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा केली आहे.
सीमापार व्यापार
सरकारने, प्रक्रियात्मक आणि कागदपत्रांसंदर्भातल्या आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत, डिजिटलायझेशन आणि विविध एजन्सी एका डिजिटल मंचाशी जोडण्यामुळे, या प्रक्रियात्मक त्रुटी कमी होऊ शकतात आणि वापरकर्त्यासाठी अधिक उत्तम अनुभव देऊ शकतात.
भारतात समुद्री जहाजांच्या बंदरात  ये- जा करण्याचा वेळ सातत्याने कमी लागत आहे. 2010- 11 च्या 4.67 दिवसाच्या साधारणतः निम्मा होऊन 2018- 19 मध्ये हा वेळ 2.48 दिवस राहिला आहे. समुद्री बंदरांबाबत महत्वपूर्ण उद्दिष्ट गाठणे शक्य आहे.पर्यटन आणि उत्पादन यासारख्या क्षेत्रात सुलभता आणण्यासाठी नियोजित दृष्टिकिनाची गरज आहे त्यामुळे,नियामक आणि प्रक्रियात्मक अडथळे दूर होतील.

भारतात सेवा आणि निर्मिती व्यवसाय सुरू करण्यासाठी कायदा आणि विनियमन यांच्या संबंधीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.
भारतात एक करार लागू करण्यासाठी सुमारे 1445 दिवस लागतात न्यूझीलंड मध्ये 216 दिवस तर चीनमध्ये यासाठी 496 दिवस लागतात. कर भरणा करण्यासाठी भारतात 250 हुन अधिक तास लागतात तर न्यूझीलंड मध्ये 140 तास चीनमध्ये 138 तास लागतात.या मापदंडात सुधारणा घडवायला वाव आहे.


(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

आर्थिक सर्वेक्षण 2019-20 ची ठळक वैशिष्ट्ये

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2019-20 सादर केले. या सर्वेक्षणाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-
  • 2020-21 मध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादन 6 ते 6.5 टक्केदरम्यान राहील असा अंदाज आहे.
  • 2019-20 च्या उत्तरार्धात स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होण्याची शक्यता, पहिल्या पूर्वार्धात 5 टक्के विकास दर राहील असा अंदाज व्यक्त
  • आगामी आर्थिक वर्षात कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या वाढीचा दर 2.8 टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू वर्षात कृषी वाढीचा दर 2.9 टक्के राहील, असा अंदाज आहे.
  • भारतीय शेतीला व्यावसायिक शेतीमध्ये परिवर्तीत करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण
  • औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार औद्योगिक क्षेत्राने 2018-19 मधील 5 टक्क्यांच्या तुलनेत 2019-20 (एप्रिल ते नोव्हेंबर) मध्ये 0.6 टक्के वाढ नोंदवली.
  • 2014 पासून चलनफुगवट्याच्या दर स्थिर होत आहे. 2014-19 दरम्यान बहुतांश आवश्यक वस्तूंच्या किंमतीत घट झाली.
  • 2019-20 च्या सुरूवातीच्या आठ महिन्यात महसूल संकलनात गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठी वाढ नोंदवली गेली.
  • 2019-20 मध्ये (डिसेंबर 2019 पर्यंत)जीएसटी मासिक संकलनाने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला.
  • 2018-19 (एप्रिल ते डिसेंबर 2018) मधील 3.7 टक्क्यांच्या तुलनेत ग्राहक किंमत निर्देशांक 2019-20 मध्ये (एप्रिल ते डिसेंबर 2019) 4.1 टक्क्यांपर्यंत वाढला.
  • घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत चलनफुगवट्याचा दर 2018-19 मधील (एप्रिल ते डिसेंबर 2018) 4.7 टक्क्यांच्या तुलनेत 2019-20 मध्ये (एप्रिल-डिसेंबर 2019)1.5 टक्क्यांपर्यंत खाली आला.
  • सर्वसमावेशक विकासासाठीच्या सुरचित उपाययोजनांच्या माध्यमातून शाश्वतता आणि आर्थिक विकासाची सांगड घालण्याचा भारताचा प्रयत्न. जगातील सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा कार्यक्रम हाती घेतला. भारत हा चीन नंतर दुसरा सर्वात मोठा उदयोन्मुख हरित रोखे बाजारपेठ असलेला देश
  • चालू खात्यातील तूट कमी झाली, परकीय चलनसाठा समाधानकारक. थेट परदेशी गुंतवणुकीचा प्रवाह आणि परदेशातून भारतात पाठवल्या जाणाऱ्या निधीत वाढ. परकीय चलनसाठा 461 अब्ज अमेरिकन डॉलर्स
  • उत्पादित वस्तूंची भारताने केलेल्या निर्यातीत 13.4 टक्के वाढ तर सर्व वस्तूंच्या निर्यातीत 10.9 टक्के वाढ
  • उत्पादित वस्तूंच्या आयातीत 12.7 टक्के वाढ
  • सर्वात जास्त निर्यात झालेल्या वस्तू. पेट्रोलियम उत्पादन, मौल्यवान खडे, औषधे, सोने आणि अन्य मौल्यवान धानू
  • 2019-20 मध्ये सर्वात जास्त निर्यात झालेले देश अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, चीन आणि हाँगकाँग
  • सर्वात जास्त आयात वस्तू कच्चे पेट्रोलियम तेल, सोने, कोळसा, कोक
  • निर्मित वस्तूंचा अतिरिक्त व्यापार 0.7 टक्के तर एकूण वस्तूंचा व्यापार प्रतिवर्ष 2.3 टक्के
  • भारताने सर्वात जास्त आयात चीनमधून आणि त्या खालोखाल अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाकडून केली
  • उदारीकृत क्षेत्रांने सर्वात जलद लक्षणीय वाढ नोंदवली.
  • 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या आकांक्षा प्रामुख्याने पुढील बाबींवर अवलंबून असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
  1. संपत्ती निर्माण करण्यासाठी स्पर्धात्मक बाजारपेठेच्या शक्तीचा वापर करण्यासाठी उद्योगाभिमुख धोरणाला प्रोत्साहन
  2. विशिष्ट खासगी हित जपणाऱ्या धोरणापासून फारकत
  • जागतिक बँकेनुसार नवीन कंपन्यांच्या निर्मितीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. 2018 मध्ये 1.24 लाख नवीन कंपन्या उभारण्यात आल्या.
  • उत्पादन, पायाभूत किंवा कृषी क्षेत्राच्या तुलनेत सेवा क्षेत्रात नवीन कंपन्यांची निर्मिती लक्षणीय आहे
  • भारताला चीनप्रमाणे कामगाराभिमुख आणि निर्यात वाढवण्याची अभूतपूर्व संधी असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. ‘जागतिक फायद्यासाठी भारतात संघटीत व्हा अर्थात Assemble in India for the world’ चे मेक इन इंडियामध्ये एकात्मिकरण करून भारत पुढील गोष्टी करू शकतो.
  1. निर्यात बाजारपेठेतील हिस्सा 2025 पर्यंत 3.5 टक्क्यांनी आणि 2030 पर्यंत 6 टक्क्यांनी वाढवणे
2) 2025 पर्यंत 4 कोटी आणि 2030 पर्यंत 8 कोटी उत्तम वेतन देणाऱ्या रोजगारांची निर्मिती
3) ही संधी साधण्यासाठी चीनने वापरलेल्या धोरणाचे अनुकरण करण्याची सूचना सर्वेक्षणात केली आहे.
4) नेटवर्क उत्पादनसारख्या कामगाराभिमुख क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्राविण्य प्राप्त करणे
5) नेटवर्क उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर एकत्रितरित्या कार्यावर अधिक भर देणे
6) श्रीमंत देशांमधील बाजारपेठांना प्रामुख्याने निर्यात करणे
  • बिपीसिएलमधील सरकारच्या 53.29 टक्के हिस्साच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीतून राष्ट्रीय संपत्तीत 33 हजार कोटी रुपयांची वाढ झाली
  • उदारीकरणानंतर सर्जनशील अडथळ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.
  • उदारीकरणापूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्या 60 वर्षे यामध्ये राहतील, अशी आशा होती. मात्र उदारीकरणानंतर ती 12 वर्षांपर्यंत कमी होईल. दर पाच वर्षांनी एक तृतीयांश कंपन्या या यादीतून बाहेर पडतात आणि नवीन कंपन्यांचा ओघ वाढत राहतो.
  • सरकारी हस्तक्षेप जरी तो चांगल्या उद्देशाने केलेला असला तरी त्यामुळे संपत्ती निर्मितीला सहाय्य करणाऱ्या बाजारपेठांच्या क्षमता कमी होतात आणि त्यातून उद्देश साध्य होत नाहीत.
  • व्यापार सुलभता वाढ आणि लवचिक कामगार कायद्यांची अंमलबजावणीतून जिल्हा आणि राज्यांमध्ये अधिकाधिक रोजगार निर्मिती होईल, अशी सूचना या सर्वेक्षणात केली आहे.
(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

Tuesday 28 January 2020

भाजीपाला-फळे-फुलांचा 2019-20 मधल्या उत्पादनाचा पहिला अग्रीम अंदाज

देशातल्या भाजीपाला, फळे-फुले अशा फुलोत्पादक उत्पादनांचा वर्ष 2018-19 मधला सुधारित अंदाज आणि वर्ष 2019-20 मधला पहिला अग्रीम अंदाज आज केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागात जाहीर केला.
यानुसार, 2018-19 या वर्षात देशातील 25.43 दशलक्ष हेक्टर जमिनीवर 310.74 दशलक्ष टन इतकं उत्पादन झाले. 2019-20 या वर्षासाठीचा पहिला अग्रीम अंदाजही मंत्रालयाने जाहीर केला आहे. यंदा पिक क्षेत्रात वाढ होऊन ते 25.61 दशलक्ष हेक्टर इतके असेल तसेच उत्पादनातही 313.35 दशलक्ष टनपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2019-20 या वर्षात भाजीपाला, सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र, फळे, फुले आणि मसाल्यांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. विशेषत: द्राक्षं, केळी, आंबे, संत्री-मोसंबी, पपई आणि डाळींबाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
(साभार-pib.gov.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

Mutual Fund in Marathi; घरी बसून म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी.

How to invest in Mutual Funds from Home म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे खूप रिस्की, जोखमिचे असूनदेखील गुंतवणूकदारांमध्ये हे अतीशय लोकप...