Monday 16 September 2019

इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट्स ऑफ ओरिजिन जारी करण्यासाठी सामायिक डिजिटल मंच

इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट्स ऑफ ओरिजिन जारी करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसेच वाणिज्य उद्योग राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज नवी दिल्ली येथे सामायिक डिजिटल मंचाचा प्रारंभ केला.
सामायिक डिजिटल मंचाच्या माध्यमातून निर्यातदार, एफटीए/पीटीए तसेच संबंधित संस्थांना एकाच ठिकाणी सुविधा मिळतील. सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी केली जातील. सहयोगी देश इलेक्ट्रॉनिक डेटाच्या आदान-प्रदानासाठी सहमत असतील तर सहयोगी देशाच्या सीमाशुल्क विभागाकडे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन इलेक्ट्रॉनिक रुपात पाठवली जातील.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

ऑगस्ट 2019 मधील घाऊक किंमत निर्देशांक

ऑगस्ट 2019 मध्ये सर्व वस्तूंसाठीचा घाऊक किंमत निर्देशांक 0.2 टक्के वाढून तो 121.4 (तात्पुरती आकडेवारी) झाला. या आधीच्या महिन्यात तो 121.2 होता.
चलनफुगवटा
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात जुलै 2019 च्या तुलनेत ऑगस्ट 2019 मध्ये कोणताही बदल न होता तो 1.08 टक्के कायम राहिला. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 4.62 होता.
प्राथमिक वस्तू
या गटाच्या निर्देशांकात 1.3 टक्के वाढ होऊन तो 143.9 (तात्पुरती आकडेवारी) झाला. या आधीच्या महिन्यात तो 142.1 होता.
अन्नधान्य गटाच्या निर्देशांकात 1.4 टक्के वाढ होऊन तो 155.9 झाला. अखाद्य वस्तू गटाच्या निर्देशांकात 0.9 टक्के वाढ झाली. कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस गटाच्या निर्देशांकात 1.4 टक्के वाढ झाली.
इंधन आणि वीज
या गटाच्या निर्देशांकात 0.1 टक्के वाढ झाली.
निर्मित उत्पादने
या गटाच्या निर्देशांकात 0.3 टक्के घट झाली.
अन्नधान्यावर आधारित चलनफुगटवट्याचा दर
अन्नधान्यावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात वाढ झाली. जुलै 2019 मध्ये तो 4.54 टक्के होता. ऑगस्ट 2019 मध्ये तो 5.75 टक्के वर पाहोचला

(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

Saturday 14 September 2019

पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ : प्रकाश जावडेकर

पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ झाला असून भारतनेट, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांचा लाभही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे असे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती, (दिशा) पुणे यांची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर जावडेकर म्हणाले, “योजनांचे नियोजन करण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख  ठेवण्यासाठी दिशाच्या बैठका होतात. मुद्रा योजनेची जिल्ह्यात वेगाने प्रगती होत असून याअंतर्गत जिल्यातील 9 लाख तरुणांना 8000 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. पुणे विभागातील 58 रेल्वे स्थानकांपैकी 46 स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध आहे. 5 सरकते जिनेदेखील बसवले आहेत.
बारामतीमधील पासपोर्ट सेवा केंद्राने आतापर्यंत 5000 पारपत्र वितरीत केली असून यामुळे सर्वसामान्यांचे आयुष्य सुकर झाले आहे; 5 जिल्ह्यात 50 ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु केली आहेत. भारतनेटने जिल्ह्यतील 790 ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर कनेक्शन दिले असून दररोज सरासरी 20 जीबी वापर होतो. शाळांना क्रीडासामग्री पुरवली जात असून खेळाचा तासही शाळांमध्ये बंधनकारक केला जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले.
आयुष्मान योजना आणि इतर योजनांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामुळे पुण्यात बालमृत्यू दर, मातृमृत्यू दर, जन्म आणि मृत्यू दर कमी करण्यात यश आले आहे; असे जावडेकर यांनी सांगितले. ‘’आतापर्यंत पुण्यातील 60,000 महिलांना प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा लाभ मिळाला आहे. शौचालय बांधण्याचे उद्दिष्टदेखील साध्य केले असून स्वछ्तेमध्ये पुण्याची क्रमवारी दहाव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लोकसहभागामुळे अंगणवाड्यादेखील वेगाने प्रगती करत आहेत”.
लोकांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देताना जावडेकर यांनी सर्व प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या धोरणाचा पुनरुच्चार केला. इंटरनेटवर हिंदीच्या वाढत्या वापराचा उल्लेख करत त्यांनी स्थानिक भाषा लोप पावत असल्याबद्दलची भीती दूर केली. इतर कोणत्याही देशात भाषेमधील इतकी विविधता क्‍वचितच पहायला मिळते; असे मत त्यांनी व्यक्त केले.
खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, देखील यावेळी उपस्थित होते.

(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

व्यापारी आणि स्वयं-रोजगारप्राप्त लोकांसाठीच्या राष्ट्रीय पेंशन योजनेलाही प्रारंभ

शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्यासाठीच्या प्रयत्नातला आणखी एका महत्वाच्या योजनेचा प्रधानमंत्री किसान मान धन योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडची राजधानी रांची येथे प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत 60 वर्षाच्या पाच कोटी छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेंशनद्वारे त्यांचे जीवन सुरक्षित करण्यात येणार आहे.
व्यापारी आणि स्वयं रोजगार असलेल्या व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय पेंशन योजनेचा प्रारंभही पंतप्रधानांनी केला. या व्यक्ती आणि व्यापाऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षीपासून किमान दरमहा 3,000 रुपये पेंशन या योजनेद्वारे मिळणार आहे.
सुमारे 3 कोटी छोट्या व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
‘जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करणारे भक्कम सरकार’ असे आश्वासन निवडणुकीच्या वेळी दिले होते.
नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. सध्या देशातल्या सुमारे साडेसहा कोटी शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात 21 हजार कोटीपेक्षा जास्त रुपये जमा करण्यात आले आहेत. झारखंडमधल्या 8 लाख शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात सुमारे 250 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. विकासाला आमचे प्राधान्य आहे आणि कटिबद्धताही, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. प्रत्येक भारतीयाला सामाजिक सुरक्षेचे कवच देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
ज्यांना अतिशय गरज आहे अशांना सरकार मदतीचा हात देत आहे. गेल्या मार्चपासून अशाच पद्धतीची पेंशन योजना देशातल्या असंघटीत क्षेत्रातल्या कोट्यवधी कामगारांसाठी सुरू आहे.
32 लाख कामगारांपेक्षा जास्त कामगार श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी झाले आहेत. 22 कोटी पेक्षा जास्त जण प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी झाले आहेत. त्यापैकी 30 लाख लाभार्थी केवळ झारखंडमधले आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 44 लाख गरीब रुग्णांना लाभ झाला असून त्यापैकी 3 लाख झारखंडमधले आहेत.
सर्वांना सक्षम बनविण्यासाठी पंतप्रधानांनी आज देशभरातल्या आदिवासी बहुल भागात 462 एकलव्य आदर्श शाळांचा प्रारंभ केला. त्या भागातल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर दर्जेदार शिक्षण पुरविण्यावर या शाळांमध्ये लक्ष केंद्रीत करण्यात येईल.
या एकलव्य शाळा, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे माध्यम म्हणून काम करण्याबरोबरच क्रीडा, कौशल्य विकास सुविधाही उपलब्ध करतांनाच स्थानिक कला आणि संस्कृतीचे जतनही यामध्ये करण्यात येणार आहे. या शाळांत प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सरकार दरवर्षी एक लाख रुपयापेक्षा जास्त खर्च करणार आहे.
साहिबगंज येथे मल्टी-मोडल वाहतूक टर्मिनलचे पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले.
साहिबगंज मल्टीमोडल टर्मिनलचे उद्‌घाटन करण्याची संधी आज मला लाभली. हा केवळ एक प्रकल्प नव्हे तर संपूर्ण भागासाठी वाहतुकीचा नवा पर्याय यामुळे उपलब्ध होणार आहे. हा जलमार्ग झारखंडला संपूर्ण देशाशी जोडण्याबरोबरच परदेशाशी जोडणार आहे. या टर्मिनलमधून आदिवासी बंधू-भगिनी, शेतकरी आपली उत्पादने देशभरातल्या बाजारपेठेसाठी सहज उपलब्ध करू शकतील, असे पंतप्रधान म्हणाले.
झारखंडच्या नव्या विधानसभा इमारतीचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले.
झारखंडच्या स्थापनेला साधारणत: दोन दशके उलटल्यानंतर लोकशाहीच्या या मंदिराचे आज उद्‌घाटन होत आहे. या पवित्र जागी झारखंडच्या जनतेच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घातला जाईल आणि जनतेच्या, भावी पिढ्यांची स्वप्नं साकारली जातील असे सचिवालयाच्या नव्या इमारतीच्या भूमीपूजनप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले.
एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
11 सप्टेंबरला प्रारंभ झालेल्या स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचा उल्लेख त्यांनी केला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान कालपासून देशात सुरू झाले आहे. या मोहिमेअंतर्गत 2 ऑक्टोबरपर्यंत घर, शाळा, कार्यालयांतले प्लॅस्टिक गोळा करण्यात येत आहे. 2 ऑक्टोबरला गांधीजीच्या 150 व्या जयंतीदिनी आपल्याला प्लॅस्टिकचा हा ढीग हरवायचा आहे, असे ते म्हणाले.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

Friday 9 August 2019

"एक देश एक शिधापत्रिका" हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सरकारचे एक महत्त्वाचे पाऊल

महाराष्ट्र-गुजरात आणि आंध्र प्रदेश- तेलंगण या दोन समूहांमध्ये आंतरराज्य शिधापत्रिका योजनेचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडून उद्‌घाटन


‘एक देश एक शिधापत्रिका’ हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकताना केंद्रीय ग्राहक व्यवहारअन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी महाराष्ट्र- गुजरात आणि आंध्र प्रदेश-तेलंगण या लगतच्या राज्यांच्या दोन समूहांमध्ये आज आंतरराज्य शिधापत्रिका योजनेचे उद्‌घाटन केले. यामुळे या समूहांतर्गत असलेल्या राज्यांमधल्या नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत असलेल्या योजनांचा या समूहातल्या कोणत्याही राज्यात लाभ घेता येणार आहे.
राज्यांच्या या दोन समूहात सुरू झालेल्या या योजनेमुळे राष्ट्रीय पातळीवर एकच शिधापत्रिका ग्राह्य धरण्याच्या या योजनेची सुरुवात झाली आहेअसे रामविलास पासवान यांनी या योजनेच्या उद्‌घाटनानंतर सांगितले. संगणकीकृत योजनेची व्याप्ती वाढल्यानंतर आंध्र प्रदेशगुजरातहरयाणाझारखंडकर्नाटककेरळमहाराष्ट्रपंजाबराजस्थानतेलंगण आणि त्रिपुरा या 11 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी या योजनेच्या राज्यांतर्गत अंमलबजावणीला सुरुवात केली आहेअसे ते म्हणाले. या राज्यांमध्ये 1 जानेवारी 2020 पर्यंत आंतरराज्य शिधापत्रिका वैधता योजना लागू केली जाईलअशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर इतर राज्यांमध्येही ही योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाईलअसे त्यांनी सांगितले.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे 309 कोटी रुपये खर्चाने अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टी उभारणार

नव्या लिक्विड जेट्टीमुळे बंदराची क्षमता वार्षिक सुमारे 4 दशलक्ष टनाने वाढण्याचा नौवहन मंत्री मनसुख मांडविया यांना विश्वास

मुंबईमध्ये जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथे आज अतिरिक्त लिक्विड कार्गो जेट्टीचे केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडविया यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. पेट्रोलियम तेल आणि वंगण, स्वयंपाकाचा गॅस, खाद्य तेल, काकवी आणि रसायने यांसारख्या द्रवरुप मालाची वाढलेली वाहतूक हाताळण्याच्या उद्देशाने 309 कोटी खर्चाचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. द्रवरुप मालाची ने-आण करणाऱ्या जहाजांना या ठिकाणी थांबता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदरांच्या माध्यमातून होणाऱ्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. हे लक्षात घेऊन भारतातील बंदरांचा विकास करण्यात येत आहे आणि जागतिक पातळीवर सुरु असलेल्या कामकाजाला अनुरुप असे त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे असे मांडविया यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांनी प्रत्येक घरात गॅसची शेगडी पोहोचवण्याचा निर्धार केला असल्याने देशात एलपीजी सारख्या द्रवरुप मालाला स्थानिक आणि औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढत आहे. सध्या वार्षिक 6 दशलक्ष टन द्रवरुप मालाची हाताळणी करण्याची जवाहरलाल नेहरु बंदराची क्षमता आहे.  नव्या जेट्टीमुळे या क्षमतेत वार्षिक 4 दशलक्ष टनाने वाढ होईल असा विश्वास मांडविया यांनी व्यक्त केला. यामुळे राष्ट्रीय गरजांची पूर्तता अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि त्यामुळे बंदराला देखील त्याचा फायदा होईल असे नौवहन मंत्र्यांनी सांगितले.
त्यापूर्वी मांडविया यांनी सर्व टर्मिनल ऑपरेटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बंदर वापरकर्ते, सेवा पुरवठादार आणि जेएनपीटीचे अधिकारी यांची बैठक घेतली. नौवहन मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मांडविया यांची जवाहरलाल नेहरु बंदराची ही पहिली भेट होती. भूमीपूजन समारंभानंतर त्यांनी चौथ्या कंटेनर टर्मिनलला भेट दिली आणि जेएनपीटी, एसईझेड प्रकल्पस्थळाला भेट दिली. यावेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी उपस्थित होते.  





(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु- शेतकऱ्यांनी निवृत्ती योजनेसाठी नोंदणी करण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आवाहन

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज नवी दिल्ली येथे वार्ताहर परिषदेत दिली. देशभरातल्या शेतकऱ्यांनी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी विविध राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय कृषी सचिव संजय अगरवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांना याची माहिती दिली आहे.http://164.100.117.97/WriteReadData/userfiles/image/image0013LX4.jpg

ही योजना ऐच्छिक असून 18 ते 40 या वयोगटातले शेतकरी तिचे सदस्य बनू शकतात. महिन्याला 55 ते 200 रुपये हप्ता भरल्यावर त्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर महिन्याला 3000 रुपयांचे निवृत्ती वेतन मिळणार आहे अशी माहिती तोमर यांनी दिली.
(साभार-pib.nic.in)

((पैश्या संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मध्ये इथे भेटेतील
((बैंकेत FD करत आहात ? थांबा
((बैंक अकाउंट न वापरणाचे नुकसान
((सेविंग्स अकाउंट (बचत खाता) नसल्याचे नुकसान....
((आपले पैसे दुप्पट,तिप्पट किवां चौप्पट कसे करावे ?
((पैसे वाचवा,श्रीमंत व्हा,आपली सर्व स्वप्न पुर्ण करा
(पैसे कमविल्यानंतर ही समस्या संपत नाही.
(कोणीही,कधीही,कुठुनही,पाहिजे तेवढे पैसे कमवू शकता
((प्रत्येकाला पैसे कमविणे गरजेचे आहे, कारण

#Marathi

Mutual Fund in Marathi; घरी बसून म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी.

How to invest in Mutual Funds from Home म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे खूप रिस्की, जोखमिचे असूनदेखील गुंतवणूकदारांमध्ये हे अतीशय लोकप...